Friday, September 20, 2024

/

तर कुडलसंगम ते बळ्ळारी पदयात्रा आमदार रमेश जारकिहोळी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मुडापेक्षा वाल्मिकी महामंडळातील घोटाळा मोठा आहे. सरकारने वाल्मिकी समाजाच्या लोकांची फसवूक केली आहे. त्यामुळे घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी कुडलसंगम ते बळ्ळारीपर्यंत फेरी काढणार आहे.

त्यासाठी पक्षाच्या वरि÷ष्ठांकडे परवानगी मागितली आहे, अशी माहीती माजी मंत्री, विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या पदयात्रेसाठी मी आणि आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ तयार आहोत. पक्षाने परवानगी दिली तर यात्रा काढण्यात येणार आहे. वाल्मिकी घोटाळा मोठा आहे. अनुसुचित जाती, जमातीचे पैसे हमी योजनांसाठी वापरण्यात येत आहेत. सरकारकडून मागास समाजाची फसवणूक केली जात आहे, असा आरोत जारकिहोळी यांनी केला.

पदयात्रेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, मात्र लवकरच सुरू होईल, मुख्यमंत्र्यांनी केलेला घोटाळा हाही मोठा घोटाळा आहे. सिद्धरामय्यांबद्दल आदर होता, पण, आता खूप वाईट वाटते, मुडा घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी. वाल्मिकी महामंडळाचा घोटाळा हा मुडा घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे, त्यामुळे आम्ही सरकारविरोधात यात्रेची तयारी करत आहोत, असेही ते म्हणाले.

सिद्धरामय्या यांची हकालपट्टी हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. सिद्धरामय्या हे सरकार सत्तेवर येण्याचे मुख्य कारण आहे. 135 जागा मिळण्यामागे सिद्धरामय्या कारणीभूत आहेत. छाती फुगवून कोणी बोलले तर होत नाही. शिवकुमार हे सीडी शिवकुमार आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.