Tuesday, February 4, 2025

/

शालेय मुलांचा आदर्श उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह:उन्हाळ्याच्या चाहुलीमुळे बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सध्या आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांसाठी अन्न, पाण्याची सोय करण्याचा आदर्शवत उपक्रम राबवत आहे.

बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात विविध वृक्ष आहेत. या वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबूतर, राघू, चिमण्या, कावळा आदी विविध पक्षी नेहमी येतात. वृक्ष तोड आणि सध्याची दुष्काळी परिस्थिती यामुळे मुक पशु-पक्षांचे अन्न पाण्याविना हाल होत असतात.

सध्या उन्हाळा सुरु झाल्यामुळे पक्षांना अन्न, पाण्याची सोय व्हावी यासाठी बालवीर विद्यानिकेतन मधील मुला-मुलींनी आकर्षक घरटी, अन्नपाण्याची भांडी तयार केली आहेत. ही घरटी, भांडी झाडावर लावण्यात आली आहेत. त्यामध्ये विद्यार्थी स्वत: अन्नपाणी टाकत असल्यामुळे उन्हाळ्यात येथील पक्षांची होणारी भटकंती थांबणार आहे.Student

सदर आदर्शवत उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रेया जाधव, समृद्धी पाटील, श्रेया नाकाडी, प्रेरणा पाटील यांच्यासह इतर मुला- मुलींनी पुढाकार घेतला असून या सर्वांचे गावात कौतुक होत आहे.

या विद्यार्थी -विद्यार्थिनींना मुख्याध्यापक के. डी. पाटील, प्रकाश मेटकर, गोविंद गावडे आणि प्राथमिक विभागाच्या रेखा शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.