Friday, October 18, 2024

/

सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील तरुण पिढीमध्ये जागृतीची गरज -अजित पवार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकांनी सदैव आपल्या प्रखर लेखणीद्वारे समाज जागृती करणे महत्वाचे असून महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भू-भाग असून बेळगाव सीमा लढ्यात उतरण्यासाठी जागृत व प्रवृत्त करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले

शारदा प्रकाशन ठाणे या संस्थेने प्रकाशित केलेल्या साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव याच्या “बेळगाव कुणाच्या बापाचं.. आणि.. प्रेयसी एक आठवण..” या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी मुंबई येथे ते बोलत होते.

मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव सीमा भाग हा महाराष्ट्राचाच असून बेळगाव सीमाभागा विना संयुक्त महाराष्ट्र अपुरा आहे. तथापी महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी हा बेळगावचा सीमाप्रश्न विसरत चालली आहे. या बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्रातील साहित्यिकानी सदैव आपल्या प्रखर लेखणीद्वारे समाज जागृती करणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीला बेळगाव हा महाराष्ट्राचा भूभाग असून बेळगाव सीमा लढ्यात उतरण्यासाठी जागृत व प्रवृत्त करणे गरजेचे आहे. बेळगाव सीमाप्रश्न न्यायालयात सुरू असून महाराष्ट्र सरकार बेळगाव सीमाप्रश्नासंदर्भात आपली बाजू ठाम व सक्षमपणे मांडत आहे.

साहित्यिक हा समाजातील लढयाचा व चळवळीचा मूलभूत कणा आहा. तो आपल्या लेखणीतून लोकशाही मार्गाने अन्यायाविरोधात न्यायासाठी लढाई लढत असतो. जनजागृती, जन प्रबोधन करत असतो, असे मतही उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त केले.

याप्रसंगी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, चंदगड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय, कार्यक्षम आमदार राजेश नरसिंगराव पाटील, ठाण्याचे खासदार आनंद परांजपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.