belgaum

पुन्हा मराठी भाषिकांना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न !

0
9
Horatti
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सुवर्ण सौध मुळेच सीमा लढ्याचं अस्तित्व संपुष्टात आले आहे असे मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी केले आहे.

बेळगावात मंगळवारी विधान सभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी सुवर्ण सौध मध्ये अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना होरट्टी यांनी मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समिती बद्दल हे वक्तव्य केले आहे.

बेळगावातील मराठी भाषिकां कडून सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी गेली 67 वर्षे लोकशाही मार्गाने सातत्याने लढा देत आहे असे असताना बेळगाव येथे तत्कालीन मुख्यमंत्री कुमार स्वामी यांच्या सरकारकडून बेळगावात सुवर्ण सौध बांधण्यात आली त्यानंतर प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात घेतले जात आहे विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्र एकीकरण समितिच्या सीमा लढ्याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे असा अजब तार्किक होरट्टी यांनी व्यक्त केला आहे.Horatti

 belgaum

कुमार स्वामी यांच्या मुख्यमंत्री काळात बेळगावात सुवर्णसौध उभारण्याचे प्रयत्न सुरू झाले.
बेळगाव येथे सुवर्णसौध बांधण्यात आल्याचा हेतू यशस्वी झाला आहे.बेळगाव सीमाभाग हा कर्नाटकाचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. असेही होरट्टी म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्या संदर्भात केलेले विधान बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी वादाचा मुद्दा ठरणार आहे.

नेहमी प्रमाणेच कन्नड नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य करून बेळगावात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जातात त्याचीच री होरट्टी यांनी ओढली आहे. त्यामुळे शांत असलेल्या बेळगावात वाद प्रतिवाद होऊन पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.