Friday, October 18, 2024

/

वारीत हरवलेले जयवंत सातेरी सुखरूप सापडले

 belgaum

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी प्रसंगी काही दिवसापूर्वी हरवलेले मजगाव येथील वारकरी ह.भ.प. जयवंत सातेरी हे माऊलीच्या कृपेने आज सोमवारी सुखरूप सापडले असून यामुळे गावात समाधानासह आनंद व्यक्त होत आहे.

सालाबाद प्रमाणे मजगाव येथील वारकरी आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी गेले होते. या वारकऱ्यांमध्ये जयवंत सातेरी यांचा सुद्धा समावेश होता. मात्र वारीदरम्यान जयवंत हे गेल्या 15 जून रोजी सासवड येथून हरवले होते. सर्वत्र शोधाशोध करून देखील ते न सापडल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वजण चिंतेत होते.

मात्र माऊलीच्या कृपेने ते शिवनेरी येथील खानापूर या गावी सुखरूप सापडले आहेत. शिवनेरी खानापूर येथील फर्निचर वर्कशॉप आणि शोरूमचे मालक किरण यादव यांचे या कामी सहकार्य लाभले.Sateri

जयवंत सातेरी तब्बल 11 दिवस बेपत्ता असले तरी त्यांच्या पाठीशी माऊलीच असल्यामुळे ते पुन्हा सुखरूप सापडले अशी समस्त वारकरी बंधूंची भावना आहे.

जयवंत सातेरी सुखरूप सापडल्यामुळे मजगावकरांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.