पाणीपुरवठा संदर्भात शिवाजीनगरवासियांचे निवेदन

0
7
Shivaji nagar water
 belgaum

बोरअवेल्स असून देखील शिवाजीनगर येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणच्या बोअरवेल्सची त्वरित दुरुस्ती करावी. तसेच पाईपलाईन घालण्याबरोबरच पाण्याच्या मोठ्या टाक्या बसवून पाणीपुरवठा सुरळीत केला जावा, अशी मागणी शिवाजीनगर येथील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर येथील नागरिक आणि महिलांनी आज शनिवारी मोठ्या संख्येने बेळगाव महापालिका कार्यालयाच्या ठिकाणी जाऊन उपरोक्त निवेदन मनपा आयुक्त आणि शहर अभियंत्यांना सादर केले.

शिवाजीनगर येथे बोअरवेल्स आहेत. मात्र त्यातील कांही नादुरुस्त आहेत. या ठिकाणी घरोघरी बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा करण्यासच्या हेतूने पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. मात्र पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन घालण्यात आलेली नाही. शिवाजीनगर येथील घरगुती नळांना आठ दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येते. तथापी ते पुरेसे नसल्यामुळे लोक बोअरच्या पाण्यावर अवलंबून असतात.

 belgaum

मात्र सध्या बोअर बिघडल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. बिघडलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करावी तसेच सध्याच्या पाण्याच्या टाक्या लहान असल्यामुळे मोठ्या टाक्या बसवाव्यात अशी मागणी यापूर्वी वारंवार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईनची देखील व्यवस्था नाही. परिणामी शिवाजीनगर येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे विशेष करून गृहिणीवर्गाची गैरसोय होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन नादुरुस्त बोरअवेल्सची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. जुन्या पाण्याच्या टाक्याऐवजी त्या ठिकाणी 2 हजार लिटरच्या मोठ्या टाक्या बसविण्यात याव्यात. तसेच बोरवेलचे पाणी संपूर्ण गल्लीसह आसपासच्या लोकांना मिळावे यासाठी आवश्यक ठिकाणी पाईपलाईन घालून पाणीपुरवठ्याची सोय केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.Shivaji nagar water

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शिवाजी मंडोळकर म्हणाले की, शिवाजीनगर येथील बोअरवेल्सना मुबलक पाणी आहे. मात्र ज्या नादुरुस्त बोअरवेल्स दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. याखेरीज बोअरचे पाणी संपूर्ण गल्लीला मिळावे यासाठी आवश्यक ठिकाणी पाईपलाईन घालणे आणि पाण्याच्या मोठ्या टाक्या बसविणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात यापूर्वी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. तूर्तास बंदावस्थेतील बोअरवेल्स दुरुस्त करून सुरू केल्यास पाण्याची समस्या थोडीफार दूर होऊ शकते. सध्या आठ दिवसातून एकदा येणारे नळाचे पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट झाली आहे.

निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक मंडोळकर यांच्या समवेत नामदेव पाटील, बाळू कदम, दत्ता प्रधान, वामन रेडेकर, वैजू घाडगे आदी नागरिकांसह शिवाजीनगर येथील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.