Saturday, July 27, 2024

/

शहरातील बिबट्याच्या बाबतीत ‘अशी ही’ प्रतिक्रिया

 belgaum

किती विचित्र आहे ना? जेंव्हा आम्ही त्यांच्या जागेवर अतिक्रमण करतो त्याला ‘विकास’ म्हटले जाते आणि जेंव्हा ते आपल्या जागेत प्रवेश करतात तेंव्हा त्याला मात्र ‘अतिक्रमण’ म्हटलं जातं. गावात दाखल झालेल्या बिबट्या वाघाबाबत सध्या शहरात सर्वत्र चर्चा, बडबड आणि गप्पा सुरू आहेत. आता पंधरावडा उलटून गेला तरी हा चलाख प्राणी कुठे ना कुठे दिसतो आणि अदृश्य होतो आहे. अनेकदा बिबटे शहरी प्रदेशात फिरकतात त्यात काही नवल नाही, तथापि आपला मात्र त्याच्याशी पहिल्यांदाच सामना होत आहे.

बिबट्या वाघ अपघाताने शहर प्रदेशाकडे फिरकतो की त्याचे अन्य कांही कारण आहे? सर्व शक्यता लक्षात घेता एकेकाळी त्यांच्या स्वतःच्या असलेल्या जागेवर मनुष्यांनी ताबा मिळविण्याची तथाकथित वन्य प्राण्याला जाणीव झाली असावी. बिबट्या ही चोर पावलाने वावरणारी सर्वोच्च मायावी प्रजाती असून तिला शोधणे अवघड असते. त्यामुळे कित्येक वर्षापासून वर्धित मानवी उपस्थिती त्यांच्यासाठी धोका आणि संधी ठरत आहेत.

धोका याच्यासाठी की जंगले कमी होऊ लागल्यामुळे बिबट्यांचे भक्ष्य (सावज) असणारे प्राणी कमी झाले आहेत. संधी यासाठी की बिबटे शहरातही शिकार करू शकतात. खास करून कुत्री त्यांचे भक्ष असतात, शिवाय जंगलाप्रमाणे या ठिकाणी सावज टिपण्यासाठी कोणी प्रतिस्पर्धीही नसतो. बिबट्यासाठी धोका आणि संधी या दोन्ही गोष्टी अपरिहार्य असल्यामुळे तू योग्य ती निवड करत आहे.

खरा धोका एकच आहे तो म्हणजे बिबट्या प्रकटणाऱ्या जागी लोकांची होणारी गर्दी. कारण मनुष्याच्या गर्दीपासून आपल्याला धोका आहे याची जर तीव्र जाणीव त्या प्राण्याला झाली तर उभयतात संघर्ष होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. तेंव्हा बिबट्याला टिपण्यासाठी आपले कॅमेरे घेण्याऐवजी सर्वप्रथम वनखाते आणि पोलीस खात्याला सतर्क करणे ही एकच साधी गोष्ट करणे अशा वेळी आवश्यक आहे. पुढे पोलीस आणि वनखात्याला त्यांचे काम करू द्यावे.

Leapord
Representative Image

आणखी एक महत्त्वाची गोष्ट नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे बेळगाव हे पश्चिम घाटाच्या काठावर वसले आहे. पश्चिम घाटाचा प्रदेश हा बिबट्यांसह गवी रेडे, अस्वल यासारख्या वन्य प्राण्यांचे माहेरघर आहे. या ठिकाणी वाघांचे देखील वास्तव्य आहे. जोपर्यंत आपण त्यांच्या प्रदेशाच्या पावित्र्याचा आदर करण्यास शिकत नाही आणि त्याचे संवर्धन करत नाही तोपर्यंत मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष सातत्याने सुरूच राहणार आहे.

याखेरीज रोग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आशा करूया बेळगावात दाखल झालेला बिबट्या आल्या वाटेने पुन्हा परत जंगलात जाईल अथवा संभाव्य परिस्थितीत त्याला पकडून पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. आपण या ग्रहाचे मालक नाही इतर प्रजातींनाही या ग्रहावर राहण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट मात्र आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे हे निश्चित.

– समीर मजली
संस्थापक ग्रीन सेव्हीयर्स असोसिएशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.