Sunday, September 8, 2024

/

अखेर दोघांच्या बळीनंतर प्रशासनाला आली जाग!

 belgaum

बेळगावमध्ये रस्ते अपघातात झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग आली आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ८ ते ११ या वेळेत बंदी घातली आहे.

गुरुवारी डीसीपी पी. व्ही. स्नेहा यांनी त्यांच्या कार्यालयात कॅम्प परिसरातील विद्यार्थी आणि पालकांची बैठक घेतली. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कडक कारवाई आणि उपाययोजना आखण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी पालकांना दिले.

यावेळी शाळा सुरू होण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळेत अवजड वाहनांना शहरात येण्यापासून रोखण्याचा निर्णय घेण्यात आला. बेळगाव शहरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने बेळगाव शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याचे पी व्ही स्नेहा यांनी सांगितले. सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत कोणत्याही अवजड वाहनांना शहरात येण्यापासून रोखण्यात येणार असून त्या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व शाळांना माहिती देण्यात येणार असून फिशमार्केट आणि कॅम्प परिसरात असणाऱ्या १५ ते २० शाळा परिसरात गार्ड नेमण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येणार असून यासाठी पालकांचे सहकार्य देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.Dcp sneha

आरपीडी आणि गोगटे महाविद्यालयाच्या मार्गाने धर्मवीर संभाजी चौकाच्या मार्गाने अनेक वाहने अतिशय वेगाने येतात. शहरातील वाहतुकीची शिस्त बिघडली असून यावर लगाम लावणे हे रहदारी पोलिसांच्या हातात असून असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी कारवाई करण्याची मागणी उपस्थित पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

या बैठकीस रिझवान बेपारी, सुनील जाधव, शकील मुल्ला, संगोळी, किरण निपाणीकर, अरुण गोजे-पाटील, नदीम फतेखान, इम्रान फतेखान आदींसह अनेक पालक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.