हलगा मच्छे बायपासचे काम जोरात सुरू आहे त्यामध्ये येणाऱ्या येळळुर वडगांव रस्त्यावरून जाणाऱ्या ब्रिजची आणि रुंदी वाढवा अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतीने केली आहेग्राम पंचायत येळ्ळूर च्या वतीने हलगा मच्छे बायपास संदर्भात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देत मागणी करण्यात...
यंदाच्या एसएसएलसी अर्थात् दहावीच्या परीक्षेमध्ये 625 पैकी 625 गुण संपादन करणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील 10 सर्वात प्रतिभावंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आपल्या कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 6 आणि चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 4...
केएलई संस्थेच्या डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या एमबीएच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापन महोत्सवांमध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे.
डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या सुषमा राणे, सुषमा कोले आणि बरूषा डी रेगो या...
बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असणारा पाऊस आणि काल गुरुवारी झालेली 100 मि. मी. पावसाची नोंद या पार्श्वभूमीवर जिल्हापालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
जिल्हा पालकमंत्री कारजोळ यांनी आपल्या स्वाक्षरीने अधिकृत पत्राद्वारे बेळगावच्या...
बेळगाव शहर परिसरात मे महिन्यात सर्वसामान्यपणे सरासरी 95 मि. मी. इतकी पावसाची नोंद होते, मात्र यंदा या महिन्यात आजतागायत म्हणजे अवघ्या 20 दिवसात 72 मि. मी. पाऊस नोंदवला गेला आहे.
बेळगाव सरकारी विश्राम धाम याठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन उपकरणात मे महिन्यात...
बालक आणि पालक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो दहावीचा निकाल राज्यात जाहीर झाला. काही विद्यार्थांनी 625 पैकी 625 गुण संपादन केले त्यांना पाहून मला देखील खूप आनंद झाला. मा जगदंबेच्या कृपेने कोरोना सारख्या अवघड परिस्थितीत देखील बहुतेक विद्यार्थांनी...
बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या संकटांना सामोरे जावे लागत असल्यामुळे सरकारने या शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकारी...
कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयास विविध विधायक उपक्रमांसाठी राज्य मराठी विकास संस्था मुंबईकडून 60 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
कावळेवाडी राष्ट्रपिता महात्मागांधी सामाजिक संस्था व वाचनालयास यापूर्वी 36...
गेल्या 24 तासापासून पडणाऱ्या पावसामुळे बेळगाव शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील शेत-शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यामुळे भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी लाखो रुपयांचा फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
काल गुरुवारी सायंकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे...
विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीची अधिसूचना काल गुरुवारी जारी करण्यात आली असून अधिसूचनेबाबतचे पत्रक प्रादेशिक आयुक्त व निवडणूक अधिकारी आमलान आदित्य बिश्वास यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
निवडणूक अधिसूचना जारी झाल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुभा असली...