हिजाब प्रकरणी जो कर्नाटक उच्च न्यायालय निकाल देईल तो सरकार मान्य करेल-निकाल काय येईल सांगता येत नाही मात्र निकाल पाहूनच सरकार पुढील निर्णय घेणार आहे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृह मंत्रालय पाऊल उचलेल असे मत शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी मांडले.
हिजाब प्रकरणी पत्रकारांनी छेडले असता त्यांनी त्यांनी हे वक्तव्य केले.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश म्हणाले, हिजाब विरुद्ध भगवा वादावरून राज्यातील शाळा-महाविद्यालयात उदभवलेल्या परिस्थितीबाबत मुख्यमंत्री बोम्मई याना माहिती दिली आहे.
ही परिस्थिती पाहता या घटनांमाहे अज्ञात शक्तींचा हात आहे. धर्मच मुख्य म्हणून विद्यार्थिनी हट्टाला पेटून उठल्या आहेत. हे पाहता, देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या दुष्ट शक्तींच्या कटामुळे हा गोंधळ निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
हिजाब काय आहे?
मुस्लिम मुलीना हिजाब परिधान करून शाळेत वर्गात शिकण्यास उडुपी येथे मनाई करण्यात आली त्यानंतर राज्यभरात अश्या घटना घडल्या.राज्य सरकारने धार्मिक ड्रेस शाळांतून बंदी घातली त्यावर उच्च न्यायालयात मुस्लिम संघटना याचिका घातलत्यावर उद्या सुनावणी होणार आहे.हिजाब म्हणजे मुस्लिम मुली किंवा महिला चेहऱ्यावर आणि डोक्यावर परिधान करतात त्यांला हिजाब म्हणतात.