इतके आमदार, खासदार असूनही बेळगावात विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला? याचे कारण शोधले पाहिजे. कोण सहकार्य केले नाही? याची चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले आहे.
भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या बेळगाव विधान परिषद निवडणुकीतील पराभवाबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात काल माजी मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा झाली आहे. तेच याबाबतीत निर्णय घेतील. याबाबत सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ माहिती गोळा करून कार्यवाही करतील. बेळगाव आणि म्हैसूर मतदारसंघांमध्ये भाजपचा विजय निश्चित होता.
मात्र आम्ही पिछाडीवर राहिलो. बेळगावच्या अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या समस्या आणि विकासावर चर्चा करण्यात येईल, असे सभापतींनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला सहमती दर्शविली आहे, अशी माहितीही यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.