Tuesday, February 11, 2025

/

पर राज्यात प्रवास करणाऱ्यावर सर्व बंधन शिथिल

 belgaum

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांवर आणि वस्तूंची वाहतूक करण्यावर असलेली सगळी बंधने शिथिल करण्याचा आदेश केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना दिला आहे.

आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवास करण्यावर स्थानिक पातळीवर अजूनही बंधने असल्याबद्दल केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांशी पत्रव्यवहार केला आहे.अनलॉक प्रक्रिया सुरु असताना अशा तऱ्हेची बंधने घातल्यामुळे अनेक बाबीवर परिणाम होत आहे.

वस्तूंच्या पुरवठा साखळीवर देखील परिणाम होऊन त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर आणि रोजगारावर देखील होत आहे.व्यक्तींना आंतरराज्य प्रवास करण्यावर आणि वस्तूंची वाहतूक करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नाही हे अनलॉक प्रक्रियेत स्पष्ट करण्यात आले आहे असेही मुख्य सचिवांना पाठवलेल्या पात्रात नमूद करण्यात आले आहे.

अनलॉक प्रक्रिया 1 जून पासून सुरु झाली असून त्याप्रमाणे अमलबजावणी केली पाहिजे असेही कळवण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.