Tuesday, February 11, 2025

/

रस्ता अतिक्रमण केलेल्यावर कारवाईची मागणी

 belgaum

सरकारी रस्ता अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करा अशी मागणी मन्नूर ग्रामस्थांनी केली आहे.शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करत या मागणीचे निवेदन सादर केलं आहे.

गोजगे आणि मन्नूर गावच्या शेतकऱ्यांची जमीन अतिक्रमण करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करण्यासाठी रस्ता नाही आहे सदर रस्ता अतिक्रमण केलेल्या वर कारवाई करा अशी मागणी आंबेवाडी मन्नूर ग्राम पंचायत हद्दीतील लोकांनी केली आहे.

Mannur villagers

शुक्रवारी सकाळी या भागातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत जमीन अतिक्रमण केलेल्या वर कारवाई करा अशी मागणी केली.

गोजगा मन्नूर गावच्या मधोमध अतवाड गावच्या सीमे कडे रस्ता अतिक्रमण करण्यात आल्याने रहदारी वाहतूक बंद झाली आहे या वर ग्राम पंचायतीने सर्व्हे केला आहे.पाऊस सुरू व्हायच्या अगोदर अतिक्रमण हटवून रस्ता सुरू करून ध्यावा व अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करावी असे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.