मागील एक वर्षांपासून बेळगाव उत्तर भागात आपण 70 कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून ही कामे सुरू आहेत. मागील एक वर्षात बेळगाव मध्ये जातीय दंगल झाली नाही, 1 दगड देखील पडला नाही याला जनतेचे सहकार्य आणि आपले धोरण कारणीभूत आहे. अशी माहिती बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके यांनी दिली.
आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव मध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करणे यासाठी आपण कधीच पोलीस अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. त्यांना विश्वासात घेऊनच कामे केली यामुळे व्यापार वाढला आहे. उत्तर भागात पाणी पुरवठा सुरळीत रहावा अशी व्यवस्था केली आहे. स्मार्ट सिटी व इतर योजनांतील कामांना चालना दिली आहे यामुळे विकास, शिक्षण आणि पाणी याबाबतीत आपण सातत्याने काम केले आहे, असे अनिल बेनके यांनी सांगितले.शहरात दंगली कमी झाल्या आहेत असेच वातावरण कायम राहण्यासाठी जनतेचे सहकार्य पाहिजे असेही आमदार बेनके यांनी सांगितले.
राकस्कोप जलाशयाचे गाळ काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून जलाशयात 1 की मी आत जागा शोधून डॅम ला धोका नसेल अश्या ठिकाणी गाळ काढा असे अधिकाऱ्यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.जलाशयात 1 की मी आत किती जमीन अतिक्रमण झाली ते ते शोधून तिथला गाळ काढल्यास शहराला आणखी एक अतिरिक्त महिना पाणी पुरवठा होईल असेही त्यांनी नमूद केलं.
भाजीमार्केट समस्येला संघटना पदाधिकारी जबाबदार
बेळगावमध्ये भाजी मार्केट ची जी समस्या झाली आहे आणि 10 हजार लोक रस्त्यावर आले आहेत त्याला पूर्णपणे त्या संघटनेचे पदाधिकारीच जबाबदार आहेत असे ठाम मत बेळगाव उत्तर चे आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
आपल्या एक वर्षीय कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्यांनी आज येथील होईल आदर्श पॅलेस मध्ये पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
भाजी मार्केट च्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता नको त्या व्यक्तीच्या नादाला लागून हा प्रश्न बिघडवून ठेवला आहे. ते जर माज्याकडे किंव्हा दक्षिण आमदारांकडे गेले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असा दावाही अनिल बेनके यांनी केला आहे.