गेले सात दिवस उपोषण आंदोलनात उतरलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांना बेळगाव मध्ये पाठींबा देण्यात आला, तर केंद्र सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करण्यात आला.
भ्रष्टाचार निर्मुलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मूळगुंद यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सत्ता बदल होऊन आत्ताचे केंद्र सरकार सत्तेवर आले, देशात मोठी क्रांती झाली परंतु आज हेच सरकार आण्णा यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. जन लोकपाल ला मंजुरी मिळाली नाही, यामुळे पुन्हा आण्णा हजारे यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करून आण्णा हजारे यांचे आंदोलन योग्य आहे. अशी भूमिका व्यक्त करण्यात आली.
लोकायुक्त नेमणूक, निवडणूक प्रक्रिया बदलावी या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत अशी मागणी करण्यात आली.
महात्मा गांधींच्या पुतळ्यास हार घालून आंदोलनास सुरुवात झाली. गांधीवादी अण्णांच्या आंदोलनात लक्ष घालावे आणि राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करावी असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
वयोवृद्ध अण्णांच्या आरोग्यास काहीही होऊ नये अशी प्रार्थना गणेश मंदिरात करण्यात आली.सिटीझन कौन्सिलचें अध्यक्ष सतीश तेंडुलकर,
संजय पाटील,सोमनाथ कोळकी, नागराज गडदार, सचिन राऊत, मझर मुल्ला, साजिद सय्यद यांच्यासह इतर कारकर्ते उपस्थित होते.