बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना करा, महिला व युवकांना प्राधान्य द्या आणि समितीची एक आचार व विचार संहिता निश्चित करा अशी मागणी समितीशी निष्ठ दबाव गटाने केली आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला तसे पत्र देण्यात आले आहे. माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, युवा कार्यकर्ते रवी निर्मळकर, मदन बामणे व सूरज कणबरकर यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.
सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात निर्णायक मार्गावर आहे. रस्त्यावरील लढाई अधिक तीव्र आणि मजबूत केली पाहिजे. सध्या रस्त्यावरची लढाई अतिशय महत्वाची आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत म ए समितीचा पराभव झाला.
ते डोळ्यासमोर ठेऊन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या लढाईचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच रस्त्यावर उतरून अन्यायी सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी पुनर्रचना गरजेची आहे. अशी मागणी केली आहे.