तिलारी जलाशयात दोन युवक बुडाले असल्याची घटना कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यातील पोलिसांसाठी त्रासदायक ठरली आहे. घटनास्थळी काही चप्पल व सँडल मिळाले असून बाकीचे कुणीच आढळलेले नाही. यामुळे दोन तरुण बुडाले आणि बाकीचे सगळे घाबरून पळाले अशी स्थिती आहे. ही दुर्घटना की घातपात असाही संशय असून उद्या तपास झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
तिलारी जलाशयात दुपारी १२ वाजता घडलेल्या घटनेत बेळगावचे दोन तरुण बुडाले आहेत. अशी माहिती मिळाली होती.सुट्टी असल्याने फिरायला गेले असताना ही घटना घडली आहे. बेळगाव येथून तिलारी भागात फिरण्यासाठी काही तरुण गेले होते. जलाशयात उतरले असता तोल जाऊन खाली कोसळले असून त्यापैकी दोघे बुडाले आहेत.
बाकीच्या बचावलेल्या तरुणांनी मदतीसाठी धावा केला ते रडत ओरडत रस्त्यावर आले होते पण मदतीला कोणाचं मिळू शकले नाही.
घटनेची खबर चंदगड पोलिसांनाही उशिरा समजली ते दाखल झाले पण संध्याकाळ झाल्याने त्यांना काहीच स्पष्टपणे समजलेले नाही. बेळगावचे ग्रामीण पोलीस सुद्धा घटना स्थळी जाऊन आले असून त्यांनीही चंदगड पोलिसांनाच घटनेची खबर दिली आहे. उद्या तपास सुरू झाल्यानंतरच घटनेची पुढील माहिती मिळू शकणार आहे.ते सर्वजण आपले मित्र बुडाले म्हणून घाबरून पळाले की त्यांना बुडवून पळाले याचाही शोध सुरू आहे.