बेळगाव सीमा प्रश्न सुटला पाहिजे अश्या लाखो मराठी जणांची तीव्र भावना अजूनही आहेतच. मरणाच्या उंबरठ्यावर असताना प्रश्न सुटला नाही म्हणून प्राण जात नव्हता सीमा प्रश्ना काय झालं ते सांगीतल्यावरच जीव सोडला अश्या पांगुळ गल्लीतील कै लक्ष्मणराव मुतगेकर (बजरंग )नावाने ओळखत असलेल्या कट्टर स्वाभिमानी मराठी सिमा लढवयया ला मानाचा मुजरा !!
वृद्ध झाल्यावर माणसाचे भान राहत नाही असे म्हणतात. पण पांगुळ गल्लीतील कै लक्ष्मणराव मूतगेकर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील मराठी बाणा दाखविला होता. आयुष्यात शेवटची घटिका आली उपचार होउ शकत नाही अस म्हटल्यावर आता देवाच्या हातात आशा वेळी पर्याय सुचतो काही आशा राहीले काय ? मुला बाळाना बोलवा काय हवे आहे काय पहा सर्व प्रयोग झाले काही उपयोग झाला नाही जीव अडकलाय आता राहीले देवाच्या हातात .
इतक्यात एकट्याला सुचले या माणसाचे मराठी भाषा बेळगांव व सीमाप्रश्न सुटावा याचे ध्येय होते .
त्याने ताबडतोब कानात ओरडले सीमाप्रश्न सुटला
इतक्यात लक्ष्मणराव हे जय महाराष्ट्र अस ओरडले आणि त्यांनी आपला प्राण सोडला.बेळगाव प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागो हीच त्यांची शेवटची इच्छा होती.
अशा या सीमाप्रेमी माणसाला मानाचा मुजरा 10 ऑक्टोम्बर रोजी त्यांच्या निधनास सात वर्षे उलटली आहेत अश्या या बजरंगी ना बेळगाव live कडून विनम्र अभिवादन…