बेळगाव लाईव्ह : मराठी भाषिक भागातील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याप्रकरणी दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ मधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालाकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले होते. या खटल्यातील सर्व ४२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सीमालढ्याला बळ मिळाले आहे.
‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना मारहाण केली होती आणि त्यांच्यावर सात गुन्हे दाखल केले होते. यापैकी तीन खटल्यांचा निकाल यापूर्वीच लागला असून, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
आज जाहीर झालेल्या निकालात पोलिसांनी एकूण ४२ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. यापैकी सात जणांना वगळण्यात आले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ३२ जणांविरोधात हा खटला सुरू होता. मागील सुनावणीत सर्व ३२ आरोपी न्यायालयात हजर होते आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये अर्जुन नागप्पा गोरल, चांगदेव सातेरी देसाई, अनंत बारमाजी चिट्टी, वृषेशण चंद्रकांत पाटील, सामाजी बाबूराव हत्तीकर, शिवाजी शंकर कदम, सुनील निंगप्पा धामणेकर, परशराम मारुती कुंडेकर, महेश हनमंत कानशिदे, विशाल शिवाजी गोरल, अमर बळीराम पाटील, बैरू मनू कुंडेकर, किरण नारायण उदाकेकर, मोहन मारुती कुगाजी, बरमा मनोहर हळगेकर, रमेश जयराम गाडी, उदय विकास पाटील, विलास यल्लप्पा पाटील, सागर शिवाजी कुंडेकर, बाबू कचु कानबरकर, रोहित सुरेश धामणेकर, अनिल महादेव धामणेकर, चांगप्पा आनंद मिसाळे, मिथुन चांगप्पा शहापूरकर, सागर मारुती पाटील, किशन सांबरेकर, सूरज यल्लप्पा गाडी, विशाल अशोक टक्केकर, अमोल शिवाजी जाधव, राजू यल्लप्पा तोपिनाकाट्टी, अनिल शंकर कंग्राळकर, सागर यल्लप्पा काकडकर, संतोष रमेश मेळगे, बाबू बैरू मेळगे, मिंटू पिराजी बेकावाडकर, अरुण बोमानी गोरल, सुहास रामचंद्र पाटील, राहुल अर्जुन अस्तेकर, उमेश शंकर सांबरेकर, योगेश पिराजी माजूकर, अमित कृष्णा पाटील आणि प्रवीण परशराम बागेवाडी यांचा समावेश आहे.
या निकालाने सीमाभागातील मराठी भाषिकांच्या लढ्याला अधिक बळ मिळाले आहे, असे मत व्यक्त होत आहे.या पद्धतीने एकूण 7 खटल्यांपैकी 4 खटल्यांमध्ये येळ्ळूरवासियांची निर्दोष मुक्तता झाली आहे असे सांगून अद्याप तीन खटले प्रलंबित असून सर्वांच्या सहकार्याने त्या खटल्यातील आरोपींना देखील निर्दोष साबित केले जाईल, असा विश्वास ॲड. श्यामसुंदर पत्तार यांनी व्यक्त केला.


