यत्नाळ आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही : सतीश जारकीहोळी यांची खोचक प्रतिक्रिया

0
12
Satish jarkiholi
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्यावर भाजप हायकमांडने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक राजकीय नेते टीकाटिप्पण्या करत असून यावर आज बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत यत्नाळ आणि भाजपाला एकमेकांशिवाय पर्याय नाही असे म्हटले.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विविध राजकीय आणि स्थानिक मुद्द्यांविषयी माहिती दिली. कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन तसेच राज्यसरकारविरोधात भाजपने पुकारलेल्या अहोरात्र धरणे आंदोलनासंदर्भातही मंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारने टोल शुल्कात वाढ केली आहे. परिणामी सर्व गोष्टींचे दर वाढत आहेत. टोल वाढ झाल्यास दरवाढ होणे अपरिहार्य आहे. याबाबत भाजप काही बोलत नाही, दरवाढीसंदर्भात चर्चा करण्यात भाजपाला रस नाही तर केवळ आंदोलने आणि निदर्शने करण्यात त्यांना रस आहे. त्यातच ते धन्यता मानतात अशी टिप्पणीही त्यांनी केली.

बेळगावमध्ये वाढलेल्या कचरा समस्येसंदर्भात बोलताना ते म्हणाले, कचरा व्यवस्थापन, विल्हेवाट यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनानाला आपण सूचना दिल्या असून लवकरच यावर तोडगा निघेल. बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपाययोजना राबवल्या जात आहेत. पुढील महिन्यात या संदर्भात पुन्हा बैठक घेतली जाईल. गोकाक तहसीलदारांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरबाबत जिल्हाधिकारी योग्य ती कारवाई करतील, बेळगाव महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील गटारे स्वच्छ करावीत तसेच कचरा व्यवस्थापनाकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 belgaum

बेळगावच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली असून, मुंबईच्या धर्तीवर शहराचा विकास करण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांमध्ये तथ्य नाही आणि केपीसीसी अध्यक्ष बदलण्याचा कोणताही निर्णय हाय कमांडने घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची दिल्ली येथील भेट ही केवळ योगायोगाने घडली असल्याचे त्यांनी सांगितले.

धारवाड मधील यत्नाळ आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीबाबत विचारले असता, यत्नाळ भाजपसाठी अनिवार्य आणि भाजप यत्नाळसाठी अनिवार्य आहे. त्यांचा विचारसरणी आणि लढाऊ बाणा भाजपमध्येच बसतो, असे सांगत यत्नाळ यांचा नव्या पक्षाच्या चर्चांना त्यांनी खोडून काढले. वर्षभरातच ते पुन्हा भाजपमध्ये असतील, असा दावाहि त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.