Wednesday, October 16, 2024

/

महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात सीमा प्रश्नाचा उल्लेख करावा

 belgaum

बेळगाव लाईव्ह: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात बेळगाव सीमा प्रश्नाचा उल्लेख करावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.

बुधवारी इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि माजी मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमा प्रश्न संबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत.Mes bgm

या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लाम पूर येथे माजी कृषिमंत्री श्री शरद पवार आणि श्री जयंतराव पाटीलयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसचे नाना पटोले यांनाही पत्रे पाठवण्यात आली आहेत.

महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीशी आपण चर्चा करतो असे शरद पवार यांनी आश्वासन दिले आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळात माजी आमदार मनोहर किनेकर प्रकाश मरगाळे सुनील आनंदाचे व श्री विनोद आंबेवाडी कर यांचा समावेश होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.