Sunday, September 8, 2024

/

कोयना जलाशयातून दर अर्ध्या तासाला माहिती -जिल्हाधिकारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील सातारा येथील पंचगंगा नदीतून कोयना जलाशयात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची आकडेवारी दर अर्ध्या तासाला आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम तेथील आमचे अधिकारी करत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शनिवारी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. आपण कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा करून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण जाणून घेतले आहे.

आमचे अधिकारी दर अर्ध्या तासाला कोयना जलाशयातून माहिती देत आहेत. सातारा येथील पंचगंगा नदीतून कोयना जलाशयात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची दर तासाला आकडेवारी गोळा केली जात आहे. राजापूर जलाशयातून सुमारे 1 लाख 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग बेळगाव जिल्ह्यात होत आहे.

ते पाणी दूधगंगा नदी मिसळून 2.35 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कल्लोळ बंधाऱ्यात होत असून हे सर्व पाणी अलमट्टी जलाशयात सामील होत असल्याचे जिल्हाधिकारी रोशन यांनी पुढे सांगितले.Mohamnad roshan

घटप्रभा नदीतून 65 हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अलमट्टी जलाशयातून सुमारे 75 हजार ते 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्रातून येणारे पाणी अडवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

पावसाची समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नोडल कार्यालयाचा एक अधिकारी नेमण्यात आला आहे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.

कोयना जलाशयात त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून दर अर्ध्या तासाला माहिती घेतली जात आहे. आम्ही जत्राट बॅरेजची देखील माहिती घेत आहोत, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.