Tuesday, July 9, 2024

/

तीन मुलांना सोडून तिने केले दुसऱ्याशीच लग्न!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आपल्या तीन मुलांना माघारी सोडून एका महिलेने दुसऱ्याशी लग्न करून नव्याने संसार थाटल्याची घटना बेळगावमधील गणेशपूर भागात उघडकीस आली आहे. आपल्या १०, १५ आणि १९ वर्षाच्या तिन्ही मुलांना माघारी सोडून वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा पद्धतीने मिळविलेल्या सरकारी नोकरीसह सदर महिलेने नवा संसार थाटला आहे.

या तिन्ही मुलांनी कॅम्प पोलिसात धाव घेत आपल्या आईला परत बोलाविण्यात यावे अशी तक्रार केली आहे. तिन्ही भावंडांनी शिक्षण सोडून देऊन आईला आपण कमावून आणून देऊ परंतु आपल्या आईला पुन्हा परत बोलवा, अशी मागणी केली.

मात्र दुसऱ्यासोबत संसार थाटल्याने आपल्या तिन्ही मुलांकडे या महिलेने दुर्लक्ष केले आहे. हि तिन्ही भावंडं सध्या आपल्या आजीकडे राहात असून याप्रकरणी पोलीस देखील असहाय बनले आहेत.

 belgaum

ज्याच्याशी या महिलेने विवाह केला आहे त्या व्यक्तीचे यापूर्वी महिलेसोबत वाद झाले आहेत, शिवाय एका महिलेने श्रीमुखात लगावली असल्याचीही माहिती आहे. शिवाय या प्रकारचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर वायरल झाला होता.

या व्यक्तीशी विवाह करणे योग्य नसल्याचे तिन्ही मुलांनी सांगितले. परंतु प्रेमात आकंठ बुडालेल्या या महिलेला आपल्या तिन्ही मुलांची अजिबात दया आली नाही. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचे बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.