Friday, October 18, 2024

/

भाजपकडून ईस्ट इंडिया कंपनीचे तंत्र – सुरजेवाला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावात आलेले काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून टीका करत देशातील वसाहतशाहीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीने वापरलेले तंत्र भाजप वापरत असून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे जातीच्या आधारावर समाजात फूट पाडत आहेत, असा आरोप केला.

शहरातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रातील भाजप सरकार कन्नड विरोधी असून जनतेच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्यात ते अपयशी ठरले आहे असा आरोप करून कर्नाटकातील दुष्काळाच्या समस्येचा मुद्दा उचलून धरत सुरजेवाला यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकाराने राज्यात दुष्काळाची घोषणा न करता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) मिळणारा निधीही रोखून धरला आहे, अशी टीका केली.

भाजप सरकार एकूण 58 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यास विलंब करत आहे असे ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे प्रमुख सदस्य सतीश जारकीहोळी, राजू सेठ आणि लक्ष्मण सवदी यांच्या समवेत सुरजेवाला यांनी रिकामी चंबू दाखवून मोदी सरकारचे अपयश सुचित केले. तसेच गो बॅक मोदी, अमित शाह गो बॅक अशा घोषणा देऊन जनतेच्या भावना व्यक्त करत रणदीप सिंग सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.Surajewala randeep

यावेळी सुरजेवाला यांनी हुबळी खून प्रकरण, अनंत कुमार हेगडे यांचे घटनाविरोधी वक्तव्य, काँग्रेसच्या हमी योजना यावर अधिक लक्ष केंद्रित करत भाजपवर टीकाही केली. भाजप म्हणजेच भारतीय चंबू पार्टी अशी टीका करत आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारमुक्त भारत बनविण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.