तब्बल 57,397 हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका

0
3
Belgaum farmers paddy
 belgaum

पावसाचा कहर संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावर झाला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 57,397 हेक्टर जमिनीतील पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये 322 हेक्टर बागायती पिकांचा समावेश आहे.

जिल्हा कृषी खात्याकडून पीक नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. गेल्या 1 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष, केळी आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे.

त्याचप्रमाणे जून ते 10 ऑक्टोबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 113 हेक्टर शिवारातील भात पिकांचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर पूर्वी ज्या शेत पिकांचे नुकसान झाले आहे त्यासाठी सरकारने 17 कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.Belgaum farmers paddy

 belgaum

पिक आणि घरांच्या पडझडीपोटी सरकारने 104 कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मंजूर केले असले तरी ही भरपाई अत्यल्प पुरेशी नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे सरकारने प्रति एकर 10 ते 15 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करावी.

तसेच राष्ट्रीय कृषी दर आयोगाच्या नियमाप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना 20 हजार रुपये तरी द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जनावरांना झालेल्या लंपी स्कीन आजारामुळे एकीकडे शेतकरी चिंतेत असताना अद्याप बंद न झालेल्या पावसामुळे पीक नुकसानीचे संकट त्यांच्यासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.