Thursday, July 4, 2024

/

खानापूर तालुक्यात भिंत कोसळून बालकाचा मृत्यू

 belgaum

गेल्या आठवड्यावर पासून मुसळधार सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून 15 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.खानापूर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत व्याप्ती मध्ये येणाऱ्या चुंचवाड गावच्या अनंतू धर्मेंद्र पाशेट्टी वय 15 असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.

गुरुवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
घटनास्थळावरून समजलेल्या माहितीनुसार सदर बालक राहत असलेल्या बाजूला गोठ्यामध्ये जनावरांना ठेवण्यात आले होते.

गुरुवारी रात्री गोठ्यामधील जनावरांना चारा घालायला गेला असता अचानक भिंत अनंताच्या अंगावर कोसळली या घटनेत तो गाडला गेला आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला.Anant pashetty

घटना समजतात नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला घटनेची नंदगड पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

यावर्षीचा पावसात घराची भिंत कोसळून मयत झालेला बेळगाव जिल्ह्यातील हा पहिला बळी आहे सतत होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कच्ची घरे कोसळत आहेत सरकारने यासाठी तात्काळ नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.