Sunday, October 6, 2024

/

जिल्ह्यात अजूनही 4 हजार 258 घरांच्या कामांना सुरुवात नाही

 belgaum

मागील काही वर्षापासून कोणत्याही योजनेतून वस्ती घराणा मंजुरी मिळाली नाही. मात्र ज्या घरांना मंजुरी मिळाली आहे त्यामधील 4 हजार 258 घरांच्या कामाला सुरुवातच झाली नाही ती कामे अजूनही अर्धवट आहेत. त्यामुळे यापुढे तरी ही कामे होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रत्येकाच्या स्वप्नात आपले घरकुल असावं अशी अपेक्षा असते. त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून बसव वस्ती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना अटल बिहारी वाजपेयी व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांना मंजुरी देण्यात येते.

मात्र 2019 -20 या वर्षात 4258 घरांची कामे सुरू करण्यात आली नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. एकूण जिल्ह्यात 7 हजार 112 घरांना मंजुरी मिळाली होती.

त्यापैकी अनेक कामे अर्धवट आहेत याचा फटका अनेकांना बसत आहे. अनेकांची कागदपत्रे सुरळीत नसल्याने ही कामे कधी एकदा पूर्ण होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 2016- 17 पासून आतापर्यंत केवळ 191 घरीच पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांची कामे करण्याकडे आता सरकारने लक्ष देण्याची गरज व्यक्त झाली आहे.

2848 घराना आतापर्यंत सुरुवात झाली आहे मात्र ते अजूनही अर्धवट आहेत. काही घरांची कामे लेव्हल फाऊंडेशन व छत घालण्यापर्यंत झाली आहेत ती कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी याकडे आता गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. एकंदरीत हा सारा प्रकार पाहिल्यास यापुढे तरी घरांची कामे पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

आता नुकतीच प्रत्येक ग्रामपंचायतीला 20 घरे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र पूर्वीची घरे अजून अर्धवट असल्याने आता मंजूर करण्यात आलेल्या घरांची कामे ही पूर्ण होणार की ती तशीच राहणार याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.