पिक खराब झाल्याने नैराश्येतून शेतकऱ्याची आत्महत्या

0
2027
 belgaum

गेल्या आठवड्यात बटाटे लागवड केल्यानंतर मुसळधार पाऊस झाल्याने लागवड केलेले बटाटा बियाणे कुजल्याने गोजगा येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

अशोक कृष्णा बामणे वय 59 रा. गोजगा असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

Kakati police station
Kakati police station

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी शेताकडे जाऊन लागवड केलेले बटाटे पाहून आल्यापासून ते निराश होते, परत सकाळी उठून शेताकडे जाऊन आल्यानंतर बियाणे कुजल्याने नैराश्येतून शेतातीलच झाडाला गळफास लावून घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

 belgaum

मयत शेतकऱ्याच्या पश्चात्य यांच्या पश्चात्य आई,पत्नी,दोन भाऊ, दोन मुले आहेत.
या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून उत्तरणीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.एकीकडे कोविड मुळे आलेलो आर्थिक मंदी तर दुसरीकडे पिकांचे नुकसान यामुळे अश्या घटना होत असून शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.