belgaum

भाजप पंधरा आमदार कोठून आणणार?-एम बी पाटील यांचा सवाल

म्बपस्ती

0
761
M b patil home
 belgaum

राज्यातील युती  सरकारला धोका नाही.आणखी चार वर्षे सरकार पूर्ण करेल.भाजपला पंधरा आमदार पाहिजे आहेत.भाजप पंधरा आमदार कोठून आणणार?असा सवाल गृहमंत्री एम बी पाटील यांनी व्यक्त केला आहे.सोमवारी ते बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पोलीस पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली.

तीन चार विकेट पडले तरी जनता दल काँग्रेस सरकारला कोणताही धोका नाही हे सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

M b patil home

 belgaum

यावेळी त्यांनी जारकीहोळी यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रमेश जारकीहोळी यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला नाही.आनंदसिंग यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.राजीनामा सभापतींच्याकडे दिल्यावर त्यानंतर त्याबाबत कार्यवाही होते.रमेश जारकीहोळी माझे चांगले स्नेही आहेत.मी त्यांच्याशी माहिती घेऊन बोलतो असे ते म्हणाले.

पोलीस खात्याच्या प्रलंबित योजनांची माहिती घेतली असून लवकरच ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.