Wednesday, February 12, 2025

/

भाजपचा पराभव हा दृष्टिकोन समोर ठेऊनच जागावाटप -सिद्धरामय्या

 belgaum

फोन केल्यावर त्यांनी फोन घेतला नाही मी त्यांना संपर्क करणार आहे ते अद्याप मला भेटले नाहीत कोणत्याही परिस्थितीत रमेश जारकीहोळी काँग्रेस सोडणार नाहीत असा दावा माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.कडोली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लोकार्पण केल्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

रमेश वर माझा राग नसून मी त्याच्यावर नाराज नाही आजही पूर्वी इतकेच  ते मला प्रिय आहेत रमेश किंवा नागेंद्र कुणीही भाजपाकडे जाणार नाहीत भाजप वाले हवा करत आहेत असेही ते म्हणाले.स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही ते लोक कसे काय संक्रांती नंतर क्रांती करणार?असा उलटा प्रश्न करत त्यांनी भाजपवर टीका केली.

Sidharamayya

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जे डी एस काँग्रेस दोघे मिळून जागा वाटपा बद्दल निर्णय घेऊ मात्र अजून याबाबत काहीही निर्णय झाला नाही.भाजप हरले पाहिजेत हा दृष्टिकोन समोर ठेऊन जागा वाटप करू असेही ते म्हणाले.

शरद पवारांवर स्तुती सुमने

पवार देशाच नेतृत्व करणारे अप्रतिम नेते आहेत शेतकरी आणि सामान्य माणसांसाठी काम करत आलेले नेते आहेत अश्या शब्दात सिध्द रामय्या यांनी पवार यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.