गोव्याहून नववर्षाचे सेलिब्रेशन करून मुंबईला परतत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला आदळल्याने कारमधील तीन जण ठार झाले तर तिघांची स्थिती चिंताजनक आहे.पुणे बंगलोर महामार्गावर निपाणी जवळ घडला अपघात.सावित्री गुप्ता47,शोभा गुप्ता आणि आरती गुप्ता 21 अशी अपघातात मृत झाल्याची नावे आहेत.
सावित्री गुप्ताचा पती,भाऊ आणि कार चालक यांची स्थिती गंभीर आहे.जखमींना कोल्हापूर येथील खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.आज पहाटे चार वाजता हा अपघात झालाय. पहाटे मुंबईला जाताना ही कार निपाणी जवळ आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि या कारने रस्त्याकडेच्या झाडाला जोराची धडक दिली, यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला असून पोलीस यंत्रणांनी कारचा पत्रा कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले.
मृत आणि जखमी मुंबईतल्या कांदिवली भागातील असल्याचे समजते आहे. तर जखमींवर कोल्हापूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या गाडीचा क्रमांक एमएच 01 CR 5110 असा आहे.