गेल्या 10 दिवसापासून चालू झालेल्या दुर्गा माता दौडीची आज सांगता झाली. देशभक्ती , धर्मभक्ती जागृत करणाऱ्या ह्या दौडी मध्ये हजारो तरुण तरुणी सहभागी झाल्या होत्या.
मारुती गल्ली येथील मारुती मंदिर येथे सांगली येथील सच्चीदानंद कानिटकर यांच्या हस्ते आरती करून दौडीस प्रारंभ करण्यात आला .शहरातील विविध भागातुन दौड निघाली सर्व ठिकाणी दौडीचे जल्लोशी स्वागत करण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर संज्योत बांदेकर, माजी महापौर सरिता पाटील,तरुण भारत चे सलागार संपादक किरण ठाकूर, शिवप्रतिष्ठाण चे जिल्हा प्रमुख किरण गावडे, शहर प्रमुख अजित जाधव, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर उपस्थित होते, किरण ठाकूर बोलताना म्हणले की शिवप्रतिष्ठाण चे संस्थापक प्रा.संभाजी भिडे गुरुजीनी राष्ट्र हिता साठी दौडी सारखा उपक्रम सुरू केला आहे ,आजच्या काळात तरुण पीढि भरकटत असताना गडमोहिम सारखे उपक्रम राबवून तरुणांना दिशा देण्याचे काम ते करीत आहेत.सच्चीदानंद कानिटकर म्हणाले राष्ट्रवीरांचा संदेश घरोघरी पोचवीण्यासाठी ही तरुण पीढि जमली आहे दुर्गामाता दौडी च्या निमित्ताने त्या राष्ट्रवीरांचा पराक्रमच्या गाथा घरोघरी पोचत आहेत. समाजामध्ये ऊर्जा निर्माण करणारी ही दौड भविष्य काळात नक्कीच देशाभिमानी धर्माभिमानी पीढि घडवेल ह्यात शंका नाही.प.पु. भिडे गुरुजीनी शिवाजी संभाजी रक्त गटाची माणसं घडवण्यासाठीच 32 मण सुवर्ण सिहासन रायगड वर पुनर्स्थापन करण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली.महापौर संज्योत बांदेकर यांनी सर्वाना दसऱ्याच्या शुभेच्या दिल्या . किरण ठाकूर यांच्या हस्ते ध्वज उतरवून दौडीची सांगता करण्यात आली.