Sunday, September 8, 2024

/

पुढील विधान सभेत पाच आमदार निवडून आणू :किरण ठाकूर

 belgaum

बेळगाव दि १९ -जस एक मराठा लाख मराठा झाला तसा मराठ्याचा महाराष्ट्र  सीमा वासीयांच्या पाठीशी उभा राहिला तर प्रश्न सुटायला वेळ लागणार नाही मराठी माणसांनी अनेक वेळा विधान सभा निवडणुका तसेच अनेक निवडणुका जिंकली आहे  तरी देखील लोकशाहीची बाजू राखली जात नाही याची खंत वाटते . सध्या कर्नाटक विधान सभेत दोन आमदार आहेत आगामी विधान सभा निवडणुकीत पाच आमदार महाराष्ट्र  एकीकरण समितीचे असतील असा ठाम विश्वास सीमा भागाचे नेते किरण ठाकूर यांनी व्यक्त केला .

बेळगावातील मराठा समाजावर अन्याय होऊ नये म्हणू  नितेश राणे यांनी प्रयत्न करावे . बेळगावातील भाजप आणि कॉंग्रेस नेते महाराष्ट्राकडून पाणी मागायला जातात हसत खेळत महाराष्ट्र शासन त्या कर्नाटकातील नेत्यांना पाणी देत  महाराष्ट्राच पाणी यांना चालत मात्र महाराष्ट्राची भाषा यांना चालत नाही असा टोला देखील ठाकूर यांनी हाणला.  मोठ्या भावाची भूमिका म्हणून आम्ही पाणी देऊ मात्र कर्नाटकाने देखील दुजाभाव  बंद करायला हवा . असे ते म्हणाले.
महानगरपालिकेत मराठीचा झेंडा कायम राखण्यात आमदार संभाजी पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे असे ते म्हणाले.

kiran thakur speech

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.