Saturday, December 6, 2025

/

बसुर्ते धरणग्रस्तांनी दिला असा इशारा

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बसुर्ते (ता. बेळगाव) येथे बांधण्यात येणाऱ्या धरणात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना आठवडाभरात जमिनीचा मोबदला द्यावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष सुरेश पागण्णावर यांनी दिला.

बसुर्तेत नुकतीच रयत संघटनेची स्थापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बसवंत बेनके अध्यक्षस्थानी होते. संघटनेचे उपाध्यक्ष राघवेंद्र नाईक व्यासपीठावर होते. ते

म्हणाले, एक वर्षापासून बसुर्तेत धरण बांधण्याचे काम सुरु आहे. या धरणात गावातील अनेक शेतकऱ्यांची जमीन गेली असून पिकांचेही नुकसान झालेले आहे. त्या शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला व पीक नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी. अन्यथा धरणाचे काम कायमस्वरुपी बंद करण्यात येईल, असाही इशारा त्यांनी दिला.

 belgaum

नेताजी बेनके यांनी प्रास्ताविक केले. धरणग्रस्त शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत असल्याने गावात रयत संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अध्यक्ष पागण्णावर यांनी सर्व शेतकऱ्यांना हिरवे टॉवेल देऊन

संघटनेची शपथ देवविली. कार्यक्रमाला जिल्हा रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. बसुर्तेत स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध डावलून एप्रिलपासून धरण बांधण्यात येत आहे. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर ६० हजार रुपये भरपाई देण्यात आली. मात्र

जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई दिलेली नाही. प्रति एकर ८८ लाख रुपयेप्रमाणे भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात गुरुवारी गावातील महालक्ष्मी मंदिरात झालेल्या बैठकीत सरकारी वकिलांकडे व

लोकप्रतिनिधींकडे जाण्याबाबत चर्चा करण्यात आली. लोकप्रतिनिधींना भेटल्यानंतर दोन महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता पैसे खात्यावर जमा होत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु दिले जाणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.