बेळगाव लाईव्ह : बेकायदेशीर कन्नड सक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 11 ऑगष्ट रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात प्रचंड संख्येने सामील होणार असल्याचा निर्धार नेताजी भवन येथे घेण्यात आलेल्या जागृती सभेत ‘येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती’ने केला आहे. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य वामनराव पाटील हे होते.
निवृत्त शिक्षक कै. देवापा (बंडू) यशवंत घाडी आणि म. ए. समितीचे कार्यकर्ते कै. गंगाधर बिर्जे यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
. प्रकाश अष्टेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात येळ्ळूर गावाने सीमालढ्यातील योगदानाबद्दल माहिती दिली आणि यापुढील काळात येळ्ळूर नेहमीच अग्रेसर राहील, असे सांगितले.
यावेळी बेळगाव महापालिकेचे म.ए. समितीचे नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि सौ. वैशाली भातकांडे यांनी मराठी भाषेसंबंधी सभात्याकरत मराठी बाणा दाखवलेल्या मराठी नगरसेवकांचा समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी, नगरसेवक रवि साळुंखे, शिवाजी मंडोळकर आणि नगरसेविका सौ. वैशाली भातकांडे यानी समयोचित भाषणे झाली.
या जागृती सभेस शिवाजी सायनेकर, उदय जाधव, चांगदेव परीट, गोविंद बापूसाहेब पाटील, प्रकाश पाटील अजित पाटील प्रदीप देसाई सतीश शिवाजी कदम देसुरकर रामा पाखरे मिटू बेकवाडकर प्रभाकर मंगनाईक प्रवीण वालेकर महत्रू लोहार बबलू आष्टकर शिवाजी पाटील परशराम धामनेकर सौं सुवर्णा बिजगरकर सौं रुप्पा पुण्यानावर सौं वनिता परीट नागेश बोबाठे शिवाजी कदम रकेश परिट प्रकाश मालूचे कृष्णा शहापुरकर कृष्णा बिजगरकर भिमराव पुण्यानवर परशराम कनबरकर यलूप्पा पाटील बाळू धामणेकर हनमंत पाटील नंदू पाटील आनंद घाडी बाळू पाटील बाळू काकतकर पपू कडेकर प्रवीण पाटीलसूत्रसंचालन युवानेते दत्ता उघाडे यांनी केले तर आभार राजू पावले यांनी मांडले.यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


