बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नसंदर्भात दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.
कोल्हापूरचे हातकणंगले चे खासदार धैर्यशील माने यांना महाराष्ट्र शासनाने कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्यात आली होती अनुषंगाने माने यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
बेळगाव सह सीमा भागात सध्या कन्नड सक्ती राबवली जात आहे बेळगाव सीमा प्रश्न सध्या गेल्या 21 वर्षापासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे याशिवाय भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी सीमाभागात भाषिकांवर अन्याय केला जात आहे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी करून कर्नाटकाचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये समन्वय मंत्र्यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती मात्र एकदाही त्या समन्वयमंत्र्यांची बैठक घेण्यात आली नाही यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक पुन्हा एकदा बोलवावी अशी मागणी ही माने यांनी केली आहे.
बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा खटला सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित असला तरी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीच्या तारखा लवकर मिळेना त्यामुळे सदर प्रश्न कोर्टाच्या बाहेर सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावा आसाम आणि मेघालयचा प्रश्न ज्या धर्तीवर सुटला त्याच धर्तीवर हा प्रयत्न सोडवण्यासाठी प्रयत्न व्हावेत असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
28 जुलै रोजी माने यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना याबाबतचे पत्र लिहिले आहे 11 ऑगस्ट रोजी बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला बेळगाव पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलेल्या या पत्राला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे.




