बेळगाव लाईव्ह : वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती सुसाट वेगाने शेतामध्ये जाऊन पलटी झाल्याची घटना काल मंगळवारी मध्यरात्री सांबरा रस्त्यावर घडली. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कारमधील युवकांना किरकोळ दुखापती होण्यापलीकडे कांही झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सांबरा येथील कांही युवक धाब्यावर जेवण करून रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या सुझुकी बेलीनो (क्र. केए 22 एमसी 2495) कारने माघारी परतत होते. रात्रीच्या वेळी मार्गावर मोजकीच रहदारी असल्यामुळे कार भरधाव वेगाने निघाली होती.
तथापि सांबरा येथील ब्रिज ओलांडून जात असताना वळणावर वेगात असलेल्या कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती थेट रस्त्याशेजारील शेतामध्ये जाऊन पलटी झाली. ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’ या उक्तीनुसार दैव बलवत्तर म्हणून या अपघातात कारमधील युवकांना किरकोळ दुखापती होण्यापलीकडे कांही झाले नाही.

सांबरा येथील ब्रिज जवळील धोकादायक वळणावर यापूर्वीही बरेच अपघात घडले आहेत. एका अपघातात तर सांबरा विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. तरी रहदारी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित धोकादायक वळणावर अपघात टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.
या सांबरा रोडवर काही धाब्यावर बेकायदेशीर दारू विकली जात आहे त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत धाबे चालू असल्याकारणाने या ठिकाणी अपघातांची संख्या वाढली आहे असा आरोप देखील होऊ लागला आहे असे अपघात होत




