पुस्तक वाचल्याने आनंद वृद्धीगंत: प्रा. सामंत

0
1
 belgaum

बेळगाव लाईव्ह -“आपण जसजसे पुस्तक वाचत जातो, तसतसे आपला आनंद वृद्धिंगत होत जातो. जीवनात कितीही संसारीक अथवा प्रापंचिक अडचणी आल्या तरीही त्या सोडविण्याची ताकद पुस्तकांमध्ये असते”असे विचार गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी बोलताना व्यक्त केले.


सार्वजनिक वाचनालयातर्फे हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिरात 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य सावंत उपस्थित होते. वाचू आनंदे या विषयावर त्याने मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे होते.


सामंत पुढे म्हणाले की, “सुविद्य ,संस्कृत संतुलित आणि स्वानंदी भारत निर्माण करायचा असेल तर त्यासाठी पुस्तकाची वाचन महत्त्वाचे आहे. एखाद्या वस्तूचा उपभोग घेत गेल्यानंतर त्या वस्तूचे महत्त्व संपते मात्र पुस्तकांच्या बाबतीत असे होत नाही. जसजसे पुस्तक वाचत जातो तसतसे आपला आनंद वृद्धिंगत होत जातो. पुस्तकाच्या वाचनातून मिळणारा आनंद हा इतर सर्व आनंदापेक्षा वेगळा असतो आज लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद हरवला आहे त्याचं कारण पुस्तकांचं कमी झालेलं वाचन असे सांगून प्राचार्य सामंत म्हणाले की जीवनात पुस्तकाचे महत्व अनन्यसाधारण आहे ज्यांच्या हातात पुस्तके होती त्यांनीच हे जग घडविले आहे.

 belgaum

पुस्तके आपल्याला जगायला शिकवितात. जीवनाविषयक जाणीवा विकसित करतात. असे ते म्हणाले.
मूल्य विरहित व्यवसाय, मानवता विरहित विज्ञान, योगदान विरहित धर्म आणि निश्चितता विरहित शिक्षण ही आजची जीवनमूल्य ढासळण्याची मुख्य कारणे आहेत.”
पुस्तकाचे महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, ज्या घरामध्ये गाणं नाही त्या घरात वाणी नाही, ज्या घरात चांगले चित्र नाही त्या घरात चांगले नेत्र नाही, ज्या घरात पुस्तक नाही त्या घराला मस्तक नाही.

पुस्तकांचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, टॉलेस्टॉय याचबरोबर अनेक मोठ्या लेखकांची माहिती सांगितली. मराठीतील सर्वाधिक खपाच पुस्तक म्हणून साने गुरुजींच्या श्यामची आईकडे पाहिले जाते असे ते म्हणाले.
आपलं जगणं अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण करावयाचे असेल तर त्यासाठी पुस्तकांचे वाचन झालं पाहिजे. शिक्षकांनीही पुस्तकांचे वाचन केलं पाहिजे आणि मुलाकडून पुस्तके वाचून घेतली पाहिजेत.


पुस्तके माणसाला आत्महत्या पासून परावृत्त करतात हे सांगताना त्यांनी अण्णा हजारे यांचे उदाहरण दिले. रामायण, महाभारत, भगवद्गीता यासारख्या पुस्तकांनी जीवनमूल्य घडवली.
पुस्तकातील एखाद वाक्य आपल्या आयुष्यात क्रांती घडवू शकते असे सांगून त्यांनी काही उदाहरणे दिली. सुरुवातीला प्रास्ताविक करून वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी स्वागत केले. प्रा अनिल सामंत यांचा सत्कारही त्यांनी केला. उपाध्यक्ष प्रा विनोद गायकवाड यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यवाह सुनीता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर रघुनाथ बांडगी यांनी आभार प्रदर्शन केले. विविध थरातील मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.