अखेर बेळगावहून नवी ‘वंदे भारत’ रुळावर? अश्विनी वैष्णव यांची पुष्टी

0
3
Vande bharat
 belgaum

बेळगाव लाईव्ह :महिन्यांच्या अटकळी, अनेक निवेदने आणि जनतेच्या वाढत्या निराशेनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अखेर बेळगावपर्यंत बहुप्रतिक्षित वंदे भारत रेल्वेच्या विस्ताराबाबत कांही ठोस स्पष्टता दिली आहे.

मंत्री प्रल्हाद जोशी यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी “बेळगाव-धारवाड वंदे भारत रेल्वेचा बेळगावपर्यंत विस्तार आणि तिच्या वेळेत बदल करण्याबाबतचे तुमचे 10.02.2025 रोजीचे पत्र कृपया पहा. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की बेंगलोर बेळगाव वंदे भारत रेल्वे सकाळी बेळगावहून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे,” असे नमूद केले आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून ही पहिली अधिकृत लेखी पुष्टी आहे की बेळगाव येथून निघणारी समर्पित वंदे भारत रेल्वेचे काम सुरू झाले आहे. या पत्रामुळे नवीन आशावाद निर्माण झाला असला तरी नागरिक आणि या रेल्वेसाठी उत्सुक असलेले त्यांचा उत्सव नियंत्रित करत आहेत. कारण गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात अनेक उच्चस्तरीय बैठका, आश्वासने आणि भेटी झाल्या. मात्र प्रत्यक्ष सेवांच्या बाबतीत फारसे काही दिसून येत नाही. वंदे भारतची मूळ मागणी नोव्हेंबर 2022 पासूनची आहे आणि अनेकांना अजूनही वेळापत्रक आणि प्रक्रियेतील (लॉजिस्टिक) अडथळ्यांमुळे निराशाजनक वाट पहावी लागत आहे. जनतेचा आवाज आता केवळ घोषणा न करता वेळेत कृती करण्याचे आवाहन करत आहे. कांही जण असाही युक्तिवाद करतात की गुणवत्तापूर्ण सेवांसाठी अविरत वाट पाहण्याऐवजी बेळगाव ते बेंगलोर अशी जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वे अधिक लोकांना सेवा देऊ शकते आणि सध्याच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते.

 belgaum

प्रतीक्षा सुरूच असली तरी आता अधिकृत पत्र हाती आली आहे. यामुळे शेवटी बेळगावहून वंदे भारत धावेल का? हा प्रश्न असून चेंडू आता खरोखरच भारतीय रेल्वेच्या कोर्टमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.