Saturday, April 20, 2024

/

होळीत अश्वत्थामा मंदिरा समोर घालतात लोटांगण

 belgaum

11 रुद्र आणि ७ चिरंजीवी पैकी एक अवतार ठरलेला, गुरु द्रोणाचार्यांचा मुलगा आणि अदृश्य आणि अमरत्व लाभल्याने महाभारतातील कुरुक्षेत्रातील लढाईचा आजवरचा एकमेव जिवंत साक्षीदार मानला जाणारा अश्वत्थामा.

त्याचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर बेळगावात आहे. पांगुळ गल्लीतील या मंदिरात दरवर्षी होलिकोत्सव साजरा होतो. यंदाही हा उत्सव होतोय, आज रंगपंचमीच्या निमित्ताने हजारो भाविक येथे लोटांगण घालणार आहेत.

ashvatham temple

अतिशय प्राचीन असे हे मंदिर आहे. ५ ते ६ वर्षांपूर्वीच त्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. अश्वत्थामाचे हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे कोणतीही मागणी करून लोटांगण घातल्यास ती पूर्ण होते असे लोक मानतात.
होळी हा सण जुन्या रूढी परंपरा आणि विकृतीचे दहन करून नवी वाटचाल करण्याचा संदेश देतो. हा संदेश पाळत पांगुळ गल्लीत प्राचीन परंपरेला जपुन होळी साजरी होते.

कोल्हापूर, गोवा, बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील भाविक येथे दाखल होतात मध्य प्रदेश बुऱ्हाणपूर मध्ये अश्वत्थामा मंदिर असल्याच्या नोंदी आढळतात. दरम्यान बेळगावच्या मंदिराची ख्यातीही संपूर्ण देशभरात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.