Friday, April 26, 2024

/

सीमाभागाचा वाघ गेला

 belgaum

बेळगाव दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार असले तरी संपूर्ण सीमाभागाचा वाघ म्हणून ज्यांची ख्याती होती असे माजी महापौर आणि आमदार संभाजीराव पाटील यांचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे ,या निधनाने संपूर्ण सीमाभागात दुःख व्यक्त होत आहे. सीमाभागाचा वाघ गेला अशी भावना सीमाभागामध्ये आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती समिती , म ए समिती युवा आघाडी, युवा समिती त्याच पद्धतीने सीमा प्रश्नासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने हे दुःख काल रात्रभर व्यक्त केले आहे .

Ex mla sambhaji patil

 belgaum

(फोटो: file photo ex mla sambhaji patil speech)

सोशल मीडियावर संभाजी पाटील यांच्या बाबतीत श्रद्धांजली वाहणारे पोस्ट घालून प्रत्येकानेच संभाजी पाटील यांच्या बद्दल आपल्या मनात असलेला आदर सोशल मीडियावर मांडलाय. संभाजी पाटील एक मास लीडर होते .त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. बेळगाव महानगरपालिकेतून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. बेळगाव महानगरपालिकेचे तब्बल चार वेळा महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला होता. काही काळ समिती मधून बाहेर पडून त्यांनी आमदारकीच्या निवडणुका लढवल्या होत्या मात्र त्यांना यश आले नव्हते .
महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी च्या माध्यमातून काम चालू केल्यामुळे समितीने त्यांना 2013 मध्ये दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी दिली. त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला होता .आमदार झाल्यानंतर त्यांनी विकासाची अनेक कामे केली. दुसर्‍या वेळेला त्यांना संधी मिळाली नाही .वेगवेगळ्या कारणांनी संभाजी पाटील नेहमी चर्चेत राहत होते.

सध्या आजारपणामुळे ते त्रासात होते. मात्र कार्यकर्त्याशी संपर्क कायम होता, नुकत्याच झालेल्या शिवजयंतीच्या वेळीही संभाजी पाटील यांनी छत्रपती शिवाजी उद्यानात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना बळ दिले होते. युवा समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी आपले पाठबळ देऊन आता यापुढे सीमाप्रश्न तुमच्या हातात आहे तुम्ही लढा अशी सूचना केली होती. सीमाप्रश्नासाठी संभाजी पाटील यांनी पूर्वीपासूनच अनेक प्रयत्न केले आहेत ,मुंबई येथे पत्रकार यांचे आंदोलन असो किंवा इतर अनेक प्रकारे आपली इच्छा महाराष्ट्रात जाण्याची आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. महाराष्ट्राचे आणि देशाचे नाक ही मुंबई आहे ही मुंबई बंद करा तर सीमा प्रश्न सुटेल हे त्यांचे मत होते, सीमा भागात होणाऱ्या वेगवेगळ्या मेळाव्यात त्यांची तोफ वाजली होती.
नुकतेच त्यांचे चिरंजीव सागर पाटील यांचे निधन झाल्यापासून संभाजी पाटील दुःखी झाले होते त्यातच आरोग्याच्या तक्रारी सुरू होत्या. काल केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सीमाभागाचा वाघ गेला हीच सगळ्यांची प्रतिक्रिया आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.